Tuesday, March 15, 2011

शिवसेनेची ऐश्वर्या रायला तंबी

मराठी माणसाला आपलीशी वाटणारी एकमेव पक्ष या महाराष्ट्रात जन्माला आला तो म्हणजे शिवसेना. शिवसेना होती आणि आहे म्हणून महाराष्ट्रात मराठी माणूस टिकला. हे सर्व खर आहे. भाजप य्रोबर युती करून राज्यात सत्ता आणली. मराठी माणसासाठी खूप काही केले. हा झाला शिवसेनेचा इतिहास. आजही शिवसेना चांगली कामे करीत आहे त्याबद्दल वाद नाही. मनसे आणि शिवसेना जर एकत्र नंदू नाही शकल्या तरी एकमेकांचे पाय तरी ओढणार नाहीत.
आता मुळ मुद्याच बोलूया. हिंदी फिल्म अभिनेत्री ऐश्वर्या रोय हिला शिवसेनेने कन्नड परिषदेत भाग घेऊ नये असे बजावले असतानाही तिने या परिषदेत भाग घेतला. ठीक आहे याचा अर्थ आम्ही समाजाला कि ती कानाडींच्या बाजूने आहे.  तर सांगायचं अस कि शिवसेनेला ऐश्वर्या राय हिला का विरोध करायचा होता कारण ती महाराष्ट्रात कमावते व कर्नाटकात गेली. पण मला एकाच विचारायचं आहे शिवसेनेला कि, ज्या कर्नाटकात सत्तेत भाजप आहे, ती भाजप कर्नाटकातील मराठी लोकांवर अत्याचार करते तर मग शिवसेना महाष्ट्रात भाजप बरोबर युती का करून आहे? जर शिवसेनेने युती केली आहे तर तिला ऐश्वर्याला बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. कि कर्नाटकातील  भाजप वेगळी आहे व महाराष्ट्रातील भाजप वेगळी आहे? शिवसेनेने भाजपशी युती तोडावी व मनसे बरोबर एकाच मंचावर यावे.
वाचकांनी कृपया आपली मते जरूर नोंदवावी

No comments:

Post a Comment